वरवटी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. शुभांगी चाटे यांचा विजय

0
142

वरवटी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. शुभांगी चाटे यांचा विजय..

 

विजयी मिरवणूक न काढण्याचे जनतेला आव्हान

 

अंबाजोगाई, प्रतिनिधी:- शेख फेरोज /                                    बीड जिल्यातील ग्रामपंचायत निवडणुक मतदान दिनांक १८ डिसेंबर रोजी झाले आहे. आज दिनांक २० रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली. अंबाजोगाई तालुक्यांतील मौजे वरवटी येथील कै. अनंतराव माणिकराव चाटे परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. शुभांगी सुधीर चाटे या 620 च्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. तसेच 9 पैकी 8 सदस्य देखील निवडून आले आहेत. परंतु वरवटी गावातील युवक रामकृष्ण गोविंद फड (वय वर्षे 25) यांचे अपघाती निधन झाले आहे त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. सदर दुःखद निधनामुळे सौ. शुभांगी सुधीर चाटे यांनी विजयी मिरवणूक न काढण्याचे जनतेला आवाहन केले आहे.

 

जेष्ठ समाजसेवक स्वर्गीय अनंतराव चाटे यांचे नातू तसेच पॅनल प्रमुख सुधीर ज्ञानोबा चाटे यांनी सत्ता नसताना केलेली कामे,कोरोना काळात गरिबांना केलीली मदत,सर्वांच्या सुख-दुःखातील सहभाग यामुळेच हा विजय मिळाला आहे असे जनमानसात मत आहे. तसेच पॅनल प्रमुख स्वतः सुधीर चाटे व त्यांच्या पत्नी शुभांगी चाटे हे दोन्ही दाम्पत्य सिव्हील इंजिनिअर असल्याने उच्चशिक्षित सरपंच मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.पॅनल प्रमुख सुधीर चाटे यांनी सदर विजय हा स्वर्गीय अनंतराव चाटे यांना अर्पण केला आहे. तसेच राधाकृष्ण गोविंद फड यांना आदरांजली अर्पण करत विजयी मिरवणूक न काढण्याचे देखील आव्हान गावकऱ्यांना केले आहे.

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here